लसच उपाय; लॉकडाउन नाही
करोनाची
दुसरी लाट आली असतानाच तीन लशी देखील लवकरच येणार असल्याची शुभवार्ताही
आली. ही घटना एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्यात भयही दाटून आणणारी आहे.
करोनाची दुसरी लाट
आली असतानाच तीन लशी देखील लवकरच येणार असल्याची शुभवार्ताही आली. ही घटना
एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्यात भयही दाटून आणणारी आहे. करोना संकटाचा सामना
करताना पहिल्यावेळी अननुभवीपणाने सरकारसह सामान्यांकडूनही अगणित चुका
झाल्या. आता मात्र तसे काही करून चालणार नाही. झालेल्या गफलती सुधारल्या
नाहीत, बेफिकीरपणा तसाच ठेवला तर प्राणाशी हमखास गाठ, हे समजून चालावे
लागेल. सुदैवाने या संकटाची चाहूल केंद्र सरकारला लवकर लागली हे बरे झाले.
सद्यस्थितीत करोनाबाधितांची संख्या वाढणाऱ्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या लाटेच्या धोक्याची जाणीव करून दिली. राज्यांनी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. संसर्ग दर पाच, तर
मृत्युदर
एक टक्क्याच्या आत खाली आणण्याचे उद्दिष्ट स्पष्टपणे सांगितले. ते साध्य
करण्यासाठी व्यूहरचना करावी व 'आरटीपीसीआर' चाचण्या वाढविण्याचे निर्देशही
त्यांनी दिले. कर्त्याच्या भूमिकेतून मोदींनी केलेले हे मार्गदर्शन या
संकटाच्या तीव्रतेचे गांभीर्य प्रतीत करणारे होते. अशा बैठकांमध्येही
राजकीय शेरेबाजी करण्याचा मोह अनेकांना होतो, हे गेल्या काही बैठकांत दिसले
होते. येथे त्याचा पूर्ण अभाव दिसल्याने बैठकीचे गांभीर्य टिकून राहिले.
हरयाणाचे मुख्यमंत्री आकडेवारी सादर करू लागताच, त्यांना थांबवून
पंतप्रधानांनी उपाययोजनांवर बोलण्याचा सल्ला दिला, हे या बैठकीचे वेगळेपण
होते. त्यातून पंतप्रधानांचीही चिंता लक्षात आली. हा धागा पकडूनच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू झालेल्या राजकीय आंदोलनाचा
विषय उकरून संबंधितांना समज देण्याची विनंती केली.
0 Comments