विलास सहकारी साखर कारखान्याच्या
१ लाख २१ हजार १११ व्या साखर पोत्याचे
चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते पूजन
लातूर : विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामातील १ लाख २१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. १५ डिंसेबर रोजी करण्यात आले.
आदरणीय विलासराव देशमुख यांची प्रेरणा, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखाना हंगाम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालक मंडळ, प्रशासन, तोडणी-वाहतूक यंत्रणेची नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे. चालू हंगामात प्रतिदिन जास्तीत जास्त ऊसाचे गळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या हंगामात ४२ व्या गाळप हंगाम दिवसात आज अखेर १ लाख ४२ हजार ८३० मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन १ लाख २३ हजार ७२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोवीड - १९ प्रादूर्भाव अनुषंगाने सर्व नियम पाळून साखर पोती पुजन कार्यक्रम घेण्यात आला तसेच हंगाम प्रक्रीया राबवीत असतांना देखील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामातील १ लाख २१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन मंगळवार दि. १५ डिंसेबर रोजी दुपारी करण्यात आले. यावेळी चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी हंगामातील कामगिरी बददल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमास व्हा. चेअरमन रविंद्र काळे, युनीट नं. १ चे कार्यकारी संचालक जे.एस. मोहिते, युनीट नं.२चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार, संचालक युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गोविंद बोराडे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, अमर मोरे, रणजित पाटील, अमृत जाधव, सूर्यकांत सुडे, भारत आदमाने, कुसुमताई कदम, रामदास राऊत, सुभाष माने, ज्ञानोबा पडीले, माजी संचालक प्रताप पाटील, सहदेव मस्के यांच्यासह युनीटनं.१ व युनीट नं.२ चे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments