साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिव्य पुतळा उभारणार : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर 'भारतरत्न' द्यावा यासाठी प्रयत्न करणार
उदगीर : आपल्या घराची श्रीमंती ही शिक्षणापासुनच आहे त्यासाठी आपण महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे त्यामुळे प्रत्येक समाजातील नागरिकांनी केवळ शिक्षणालाच महत्व देवून आपल्या कुटुंबाचा विकास करावा. महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे मी जॅकेटमध्ये फिरतो आहे. आपणही भविष्यात मोठ्या पदावर जावु शकतो ते केवळ उच्च शिक्षण घेवुनच. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे जे एकुण साहित्य लिहिले ते सर्व साहित्य कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या ते व्यथा मांडत होते. अण्णाभाऊ साठेंनी जे जगले, अनुभवले त्यालाच त्यांनी साहित्यामध्ये शब्दरुप दिले असुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांना आपण वेळोवेळी स्मरावे अशी भावना समाजबांधवांची असल्याने आपल्या शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा भव्य दिव्य पुतळा उभारणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्य आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, सभापती शिवाजीराव हुडे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, रामचंद्र तिरुके, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, समीर शेख, प्रा.रामकिशन सोनकांबळे, दिलीप गायकवाड, शिवाजीराव देवनाळे, पप्पु गायकवाड, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सौ.उषा कांबळे, बन्सीलाल कांबळे, शिवाजीराव सुर्यवंशी, देविदास कांबळे, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, अनिल मुदाळे, सय्यद जानीमियाॅ, फय्याज शेख, संग्राम अंधारे, वसंत पाटील, बाबुराव अंबेगावे, साईनाथ चिमेगावे, मदन पाटील, बिभीषण मद्देवाड, शिवकर्णा अंधारे, अॅड विष्णु लांडगे, धिरज कसबे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तळवेस येथे अद्यावत अभ्यासिकेचे काम पूर्ण झाले असुन इतर फर्निचरसाठी २५ लक्ष दिले आहेत. ते ही काम लवकरच पूर्ण होणार आहे या अभ्यासिकेचा फायदा युपीएससी व एम.पी.एस.सी करणा-या विद्यार्थांसाठी होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी
शिक्षणाला महत्व द्या. उदगीर शहरातील
अण्णाभाऊ साठे स्मरकासाठी १५ कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच शासन स्तरावरुन त्याची मंजुरी मिळवून मी कसल्याही परिस्थितीत स्मारक उभारणारच असा शब्द उपस्थित समाजबांधवांना दिला. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासाठी लाखो रूपयांचा निधी आजपर्यंत मंजूर केला असुन उर्वरीत कामे लवकरच मार्गी लावणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टीसाठी मी पुढाकार घेवुन शासनास विनंती करणार आहे.
शहरात लवकरच महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य १५ फुटाचा पुतळा उभारणार आहे. त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा १५ फुटाचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले.
यावेळी ना.संजय बनसोडे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सुत्रसंचलन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार अॅड.विष्णु लांडगे यांनी मानले.
यावेळी मदन तुळजापुरे, रवींद्र बेंद्रे, शिवाजी वाघमारे, जवाहरलाल कांबळे, कनवर सकट, नटवर सकट, रुपेंद्र चव्हाण, राम शिंदे, मुकेश भालेराव, विजयकुमार पाटील, अमोल निडवदे, बालाजी केंद्रे, मदन पाटील, मुकेश भालेराव, राजकुमार बिरादार, बालाजी परकड, अमोल अनकल्ले, संघशक्ती बलांडे, विलास शिंदे, विदेश पाटील, पाशा मिर्झा, इम्तियाज शेख यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments