GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

नवरात्रीतील उपवासात योग्य खाद्यपदार्थ‌ निवडून व काळजी घेतल्यास‌ आरोग्याला‌ फायदा - डाॅ.भाग्यश्री घाळे

नवरात्रीतील उपवासात योग्य खाद्यपदार्थ‌ निवडून व काळजी घेतल्यास‌ आरोग्याला‌ फायदा - डाॅ.भाग्यश्री घाळे

शास्रात सांगीतले गेले आहे कि प्रत्येक युगात दुष्टप्रवृत्तीरूपी दानवाचे अंत करण्यास आदिशक्ती वेगवेगळ्या रूपात येते.सर्व वाईट‌ गोष्टींचा,वाईट प्रवृतींचा आई दुर्गेच्या आगमनाने अंत होईल या दृढ आस्थेसोबत नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे.
नवरात्रीचा हा काळ केवळ संस्कृती,आस्था भक्तीचे प्रतीक नसून आपल्या आरोग्यासाठीही तेवढेच महत्वाचे आहे.सध्या कोरोना काळात शरीर स्वस्थ ठेवणं महत्त्वाचं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे तो योग्य आणि पोषक आहार.
९ दिवसांचे उपवास हे केवळ श्रद्धा म्हणून,नियम नसून आपली जाठराग्नी,पाचनसंस्था शुद्ध,स्वस्थ होण्यासाठी आहे.उपवास आणि ध्यान केल्याने आपल्यातील सत्व वाढते. सत्व म्हणजे आपल्यातील शांती आणि प्रसन्नतेची गुणवत्ता. ह्या सात्विक उर्जेत वाढ झाल्याने आपले मन अधिक शांत आणि सजग होते. परिणामी, आपले संकल्प आणि प्रार्थना अधिक प्रबळ होतात. सात्विक आहार,आणि योग्य पद्धतीने केलेला उपवास याने शरीर अधिक हलकेफुलके आणि उर्जावान बनते. आपण अधिक कार्यक्षम होतो, काही गोष्टींची काळजी घेतल्यास,योग्य तो आहार घेतल्यास नक्कउदगीर
पवासाचा फायदा होतो. पावसाळा परतीच्या‌ वाटेवर आहे, आक्टुबर‌ हिट तीव्र‌ आहे, थंडीचे दिवस लवकरच येतील,ऋतुबदलाचा, ऋतुसंधिचा हा काळ आहे.त्यानुसार आपले खानपान हि बदललायला हवे.
फक्त चिप्स,तळलेले बटाटे ,शाबुदाणा खिचडी यांच्याऐवजी,तळीव पदार्थांऐवजी भाजणीचे,उकडीचे,शिजवलेले,वाफविलेले पदार्थ आहारात घेण्याचा प्रयत्न करावा.
 जसे भगर/शाबुदाणा पिठाची इडली,ढोकळा, उकडलेले रताळे, गोल भोपळ्याची खीर,शिंगाड्याच्या पिठाचे थालीपिठ. अशा पदार्थांमुळे अॅसिडिटी वाढणार नाही,तेलकट खाल्ल्यामुळे होणारे अपचन,मळमळी,ओकारी हा त्रास ओणार नाही व पौष्टीकांशहि मिळत राहतील.
*गुळ  शेंगदाण्याचे लाडू.
*निर्जला व्रत शक्यतो करू नये.रोगराईचे काळ आहे,हायड्रेटेड रहावे.
 साबुदाण्याचे पदार्थ, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा, सुरण, अरबी, उकडलेले रताळे इत्यादी.
साजूक तूप, दुध आणि ताक. हे आपल्या शरीराला शीतलता देऊ करतात.
दुधीभोपळ्याची खीर,
भरपूर द्रव्य पदार्थ – शहाळे, रस, भाज्यांचे सूप इत्यादी. हे उर्जा तर प्रदान करतातच शिवाय शरीराचे निर्जलीकरण होऊ देत नाही आणि उपवासा दरम्यान शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात.

*काटेकोरपणे शाकाहारी राहा.
पहिले काही दिवस धान्य टाळावे.
तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज्य करावे.
फलाहार घ्यावा,चिप्स,नायलॉन शाबुदाणा खाण्याचे टाळावे.ताज्या फळांचे सेवन करावे.
निर्जला व्रत शक्यतो करू नये.रोगराईचे काळ आहे,हायड्रेटेड रहावे.
*उच्चरक्तदाब असलेल्यांनी ,मधुमेहींनी उपवास करू नये,करायचेच असल्यास आहाराचे योग्य नियोजन करावे,नाष्टा चुकवू नये,चहा कॉफी घेऊ नये.लिंबुपाणी प्रत्येक ३ तासांनी घेत रहावे.
*गर्भिणी/गरोदर स्त्रि-प्रथम ३ महिने असता उपवास करू नये. आपण घेतलेल्या आहारातूनच गर्भाचे पोषण होत असते.त्यामुळे कडक उपवास करू नये. भरपूर दुध घ्यावे,दुधाची खीर घेत रहावे.शिंगाड्याच्या पिठाची पोळी. वरीचे तांदूळ, वरीच्या तांदळापासून बनवलेले घावन हे पदार्थ खावेत.

*फार धावपळ करू नये.कसलाही अतीरेकी‌ स्वरूपाचा व्यायाम करू नये,थोडावेळ प्राणायाम केल्यास चालेल.
तुपाचा वापर प्रत्येक पदार्थात करावा.
 आपल्याला कुठला आजार असल्यास मात्र आपल्या डॅाक्टरांच्या परवानगीनेच उपवास‌ करावा व‌ रोगानुसार आपल्या आहाराची माहिती घ्यावी.

या सणानिमित्ताने साफसफाई,सारवण करणे,घटस्थापणेसाठी शुचीर्शुद्धी या सर्वांमध्ये सर्व ताईमाईंची नक्कीच दमछाक होते. रात्री झोपताना तळपायाना हलक्या हाताने तेल लावायचे विसरू नये.आदिशक्ती ज्याप्रमाणे या संसाराचे भरणपोषण करते त्याचप्रमाणे आपणही आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करता,त्यासाठी स्वतःच्या आरोग्यचीही काळजी घेणे ही टॉप प्रायरिटी सेट करा,आपण स्वस्थ असणार तरच इतरांची काळजी घेऊ शकणार.
होमहवन करण्याने मनःशुद्धी आत्मशुद्धी तर होतेच सोबत तुप व वापरलेल्या द्रव्यांमुळे आपले वातावरण,वायुशुद्धीही होते.शारिरीक उर्जेसोबतच ध्यान अर्चना करून आध्यात्मिक उर्जेचाही या काळात नक्कीच संचय करावा. 
नवदुर्गा आपल्या आयुष्यातील दुष्टाचा,अंधकाराचा नाश करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना...

शतायु भव।

डॉ. भाग्यश्री घाळे
शतायु आयुर्वेद,
ब्राईट स्टार कॅम्पस,बिदरगेट, उदगीर

Post a Comment

0 Comments