महापुरुषांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : राज्यमंत्री बनसोडे यांचे शांतता समितीत आवाहन
उदगीर : महापुरुषांच्या जयंत्या प्रत्येक समाजातील कुटुंबाने घराघरात साजरी करावी व अभ्यासात्मक रित्या महापुरुषांना अभिवादन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता रस्त्यावर येऊन जयंती साजरी करुन कोरोणाच्या काळात समाजाचा जीव धोक्यात घालू नये.आरोग्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, जेणे करुन समाजाला फायदा होईल.असे प्रतिपादन राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी आज उदगीर येथे केले.ते "महात्मा ज्योतिबा फुले जयंती, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बसवेश्वर जयंती" साजरी करण्यासंबंधी शांतता समितीच्या बैठकी संदर्भात उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे बोलत होते.
या वेळी शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित लातूर जिल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी उपविभागीय पोलीस अधिक्षक जॉन डॅनिअल बेन,, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी नगरााध्यक्ष राजेश्वर निटुरे, बस्वराज पाटील नागराळकर, सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गजानन सताळकर,शशिकांत बनसोडे, सूशिल शिंदे इत्यादी उपस्थित होते.
राज्यमंत्री पुढे म्हणाले की, नागरीकांनी कोरोना नियमाची अंमलबजावणी काटेकोर पणे करावी. या काळात प्रशासनास सहकार्य करून शांततेत घरीच जयंती साजरी करावी. शासनाने दिलेले निर्बंध काटेकोरपने पलान करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रस्त्यावर येऊन जयंती साजरी करुन समाजाचा जीव धोक्यात आणू नये त्यापेक्षा रक्तदान शिबीराचे आयोजन करावे जेणे करुन समाजाला त्याचा फायदा होईल असे आवाहन ही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
0 Comments