अतिक्रमणमुक्तीसाठी पत्रकारांचे तिरडी आंदोलन
शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी
उदगीर : शहराच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल असाच आहे कारण आज उदगीर शहरातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पत्ररकारांना रस्त्यावर उतरावे लागले, या अतिक्रमण मुक्त रस्त्यासाठी काढण्यात आलेल्या तिरडी आंदोलनाचे शहरातील अनेक चौकात जोरदार स्वागत करण्यात आले.
दैनंदिन रहदारीसाठी अतिक्रमणाचा विळखा असुनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
उदगीर शहरांतील अनेक रस्ते अतिक्रमण बाधित झाले आहेत, सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे या बाबत अनेकांनी निवेदन दिले, पत्रकारांनी अनेक वेळेस बातम्या दिल्या पण काहीच फरक पडत नाही उलट अधिकारी मालामाल झाले हे लक्षात घेऊन पत्रकारांनी शहर अतिक्रमण मुक्तिसाठी अणि झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी 11 वाजता तिरडी आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनाची सुरूवात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासुन होवून आर्यसमाज, चौबारा रोड, छ.शिवाजी चौक येथून नगर परिषदेपुुढे समारोप करण्यात आला.
यावेळी अनेक संघटनांनी भेटून तर काहीनी भ्रमणध्वनीवरुन पाठींबा दिला. तिरडी आंदोलन मुक्कावार चौकात येताच तेथील व्यापारी नाथा कोटलवार, विकास चिद्रेवार, सुहास रंगदल, योगेश चिद्रेवार, गणेश मुक्कावार, राजू चिद्रेवार राजू पोलावर, सतिश मुक्कावार, श्रीनिवास गर्जे पिंटू धोघडे, दमयनेश्वर मारमवार, शंकर सुरेश मुक्कावार, अक्षय मालगे, बालाजी सुनील, सावजी रेजवान, मुंसी अहेमद, प्रशांत अजय हवा, प्रवीण सकलकर, सोनवणे माधव, बिबरले सुरेश, प्रविण बदलानी यांनी आंदोलन कर्ते पत्रकाराचे हार घालून स्वागत केले. आंदोलनास पाठींबा जाहीर केला तेथून तिरडी आंदोलन आर्य समाज, चौबारा मार्गे कॉर्नर वर पत्तेवार चौक व्यापारी मंडल, गणेश मंडळ यांनी स्वागत केले पोलीस स्टेशन समोर जमाते ऊलिया हिंदच्या नौशाद यांनी स्वागत केले तेथून शिवाजी चौक, बस स्टँड समोरून तिरडी नपा समोरील प्रांगणात आणण्यात आली.
यावेळी न.प. चे मुख्याधिका-यांनी निवेदन देण्याचे होते पण ते आले नसल्याने सदरील निवेदन नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांना बोलावून देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बागबंदे यांनी उदगीर अतिक्रमण मुक्त करू असे आश्वासन दिले. या आंदोलनात जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील, रोशन मुल्ला, श्रीनिवास सोनी,अशोक कांबळे, सुनिल हावा, बिभीषण मद्देवाड, सिद्धार्थ सुर्यवंशी, विश्वनाथ गायकवाड, श्रावणकुमार माने, श्रीकृष्ण चव्हाण, निवृत्ती जवळे, नागेंन्द्र साबने, रवि हसरगुंडे, अर्जुन जाधव, बस्ववराज डावळे, अनिल जाधव, सुधाकर नाईक, नागनाथ गुट्टे, संग्राम पवार, रामविलास नावंदर, फयाज डांगे, संदीप निडवदे, सुनिल सुतार, मनोहर लोहारे, मंगेश सुर्यवंशी, माधव रोडगे, राम जाधव, गंगाधर भेंडेगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल डोइजोड़े मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय राठोड, बाबासाहेब सुर्यवंशी, चंद्रकांत शिंदे, आदर्श पिंपरे, अप्पाराव पाटील मित्र मंडळाचे लक्ष्मण पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments