GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनीराज्यस्तरीय निबंध स्पर्धेत भाग घ्यावा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत भाग घ्यावा
लातूर -     सन 2020-21 या वर्षाकरीता राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी मंडळाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
            राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक/प्राचार्यांमार्फत आपले निबंध सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी, शिवाजीनगर, पुणे -411004 किंवा विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, नागपूर, औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ या पत्त्यावर 15 जानेवारी 2021 अखेर पोहोचतील, अशा रितीने समक्ष सादर करावेत किंवा पोस्टाने पाठवावेत. पाकिटावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2020-21 असा ठळक उल्लेख करावा.
            मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 अशी आहे. यानंतर प्राप्त झालेले निबंध विचारात घेतले जाणार नाहीत. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसंबंधीचे माहिती राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून दयावे, तसेच त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे.
निबंधाचे विषय पूढील प्रमाणे आहेत.                 तंत्रस्नेही शिक्षक- काळाची गरज, वाचनसमृध्दी- शिक्षकांसाठी अपरिहार्य, उपक्रमशीलता आणि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक –शरीर/ मन:स्वास्थ्य व नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका, असे सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-04 यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments